शासनकर्ती जमात व्हायला आकडेवारी नाही, इच्छाशक्ती लागते.
१९९३ ला जेव्हा सुरुवातीला मुलायम मुख्यमंत्री असलेली सपा बसपा युती तुटली भाजपकडे १७७, सपाकडे १०९ आणि बसपाकडे ६७ जागा होत्या. अटलबिहारीना वाटलं कांशीराम फोन करेल आणि म्हणेल "अटल आप सरकार बनाओ मैं समर्थन देता हूं!" आणि अटलबिहारीचा फोन वाजला. फोन कांशीरामचा होता. अटलबिहारी खुश झाले. कांशीराम म्हणाले," अटल मैं सरकार बना रहा हूं समर्थन दोगे क्या?" अटलबिहारी शॉक मध्ये. भाजपचे १७७ आणि बसपाचे ६७ आमदार आणि हा माणूस बोलतोय,"मैं सरकार बना रहा हूं समर्थन दोगे क्या?" कांशीराम म्हणाले,"पुन्हा निवडणूक व्हाव्या आणि जनतेचा पैसा खर्च व्हावा ही माझी इच्छा नाही, तुम्हाला सरकार बनवायचे असेल तर माझा पाठिंबा लागेल आणि तो मी देणार नाही. जर माझ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत असाल तर मला हरकत नाही. हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या आमच्या समाजाला "हुकमरान" बनवायची ही संधी मी सोडणार नाही." अटलबिहारींनी काही तासांचा वेळ मागितला, आणि बहुजन समाज पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला. आणि हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या पुरुषसत्ताक ब्राम्हणवादी व्यवस्थेने उभारले...