पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

होलार समाजाला संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी विट्याचे आमदार अनिल बाबर

विटा (वार्ताहर)- होलार समाजाला संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी विट्याचे आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्हयात होलार समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते नेहमी शिवसेना पक्षाबरोबर काम करीत आहेत. हा समाज नेहमी सत्तेपासून वंचित राहिला आहे. हौलार समाजास आर्थिक दृश्ट्या सक्षम बनवायचे असेल तर या समाजासाठी कोणत्याही राज्याच्या महामंडळामधून कर्ज दिले जात नाही. चप्पल तयार करण्यासाठी कातड्याचा व्यापार हा चर्मकार समाजाबरोबर होलार, मांग व ढोर समाजाचेहि योगदान आहे. त्यामुळे चर्मकार समाज बरोबर होलार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी होलार समाजाला आर्थिक विकास महामंडळात संचालक अथवा अध्यक्ष पदांवर समावेश केला जात नाही. यासाठी संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे. अन्यथा या होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. याबाबत अखिल भारतीय होलार समाज संघटना (A गट), महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी माझ्या मार्फत वारंवार पाठपुरावा व मागणी करत...

जतमध्ये पोलिसांचा रूटमार्च ;जत पोलीस स्टेशन मार्फत 31 डिसेंबर व नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांना सर्वसाधारण सूचना

इमेज
जत/प्रतिनिधी:  आज ३१ डिसेंबर निमित्ताने जत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सूचना करण्यात येते की, ३१ डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना नागरिकांनी कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी केले आहे . सध्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या पार्श्वभुमिवर मा. जिल्हाधिकारी सो. यांचे कडून जमावबंदी आदेश लागू आहेत. ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता यंदाचा ३१ डिसेंबर कुटुंबासोबत साधेपणाने साजरा करावा. ● साऊंड/स्पीकर/DJ सिस्टम लावू नये. असे केल्यास मा. न्यायालया मार्फत दंडात्मक कारवाई होऊ शकते. फटाके वाजवू नयेत. मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश व मा जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग होऊन कलम 188 प्रमाणे कारवाई होऊ शकते.  ● दारू पिवून बेदरकार वाहने चालवू नयेत. यामुळे आपले व इतरांचे जीवित धोक्यात येते. आपणावर मो. वा. का. क. 185 प्रमाणे कारवाई होऊन आपला परवाना निलंबित होऊ शकतो. ●सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन ...

श्री साईनाथ शिक्षण संस्था बालगांव संचलित डॉ पद्मभूषण वसंतरावदादा पाटील हायस्कूल बालगाव शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

  बालगांव /वार्ताहर        जत तालुक्यातील साईनाथ शिक्षण संस्था बालगांव संचलित डॉक्टर पद्मभूषण वसंतरावदादा पाटील  हायस्कूल बालगाव  येथील इयत्ता पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये एकूण नऊ  पैकी आठ विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले आहे आनंद माळी, बसवराज  माळी, दीपा  उमराणी, मल्लिकार्जुन  माळी, प्रजक्ता चांबार, प्रीती बिरादार, साक्षी खवेकर, आणी अक्षता  अमसिध्द नडहट्टी  जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकली आहे . शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे साईनाथ शिक्षण संस्थेचे चेरमन, व्हा.चेरमन सचिव व सर्व संचालक व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक  व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

ओंकार स्वरुपा तर्फे नव वर्षांत मोफत स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाचा संकल्प

इमेज
जत /प्रतिनिधी: ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्था येळवी ता.जत या संस्थेने समाजसेवेबरोबर युवा पिढी घडावी, या उच्च महत्वकांक्षेतून लोकसहभागातुन "ओंकार स्वरूपा सार्वजनिक मोफत स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाची" स्थापना करण्याचा नववर्षाचा संकल्प/निर्धार केला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची गोडी व्हावी,त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष करून विविध शासकीय/निमशासकीय सेवेमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, पी.एस.आय, एस.टी.आय,तसेच महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती त्यामध्ये पोलीस भरती,तलाठी भरती, ग्रामसेवक, तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल, वन खाते,कृषी खाते,आरोग्य, महिला व बालकल्याण यांच्या वरीष्ठ व कनिष्ठ लिपिक, सहाय्यक, पर्यवेक्षक,तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद यांचेमार्फत घेतल्या जाणाऱ्या D.Ed./B.Ed, TET, अभियोग्यता तसेच मेडिकल प्रवेशासाठी लागणारी Neet,त्याचबरोबर आभियांत्रिकीसाठी IIT, याबरोबर साप्ताहिक नोकरी संदर्भ, सैनिक भरती (INDIAN ARMY),एअर फोर्से भरती, ई...

बनाळीतील कॅनॉल मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला लवकर मिळावा - संतोष जगतापप्रांताधिकारी यांची घेतली शेतकऱ्यांसह घेतली भेट

इमेज
जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील बनाळी गावामध्ये म्हैसाळ योजना कॅनॉल केलेला आहे.यामध्ये बनाळीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत अनेक वर्षे झाली तरी मोबदला मिळत नव्हता.अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून सर्वांचे प्रस्ताव पाठवलेला आहे. तरीही या शेतकऱ्यांना काही त्याचा मोबदला मिळाला नाही.यासाठी बनाळीतील कॅनॉल मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यानी जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याशी चर्चा करून भेट घेतली व म्हैसाळ योजनेचे अभिमन्यू मासाळ यांच्याशी चर्चा करून कॅनॉल मध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी मागणी केली. आबासाहेब सावंत सर, बनाळी ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ जगताप, संजय सावंत, प्रकाश सावंत, शिवाजी यादव, सागर सावंत आदि उपस्थित होते.

आधुनिक भारतात दलित वस्तीला "शील" ठोकलंय!

इमेज
आधुनिक भारतात दलित वस्तीला "शील" ठोकलंय! #लाडेगाव, ता. केज, जि. बीड येथील हा जातीयवादी प्रकार आहे. दलित वस्तीला प्रशासनाने थेट शील ठोकले आहे. 20 वर्षांपासून लाडेगाव येथील गायरान जमीन बौद्ध कसत आहेत ग्रामपंचायतने ठराव करून वनिकरणाच्या नावाखाली जमीन बळकवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतने दलित वस्तीलाच शील लावलं आहे. सगळे रस्ते अशाप्रकारे बंद केले आहेत. हे आधुनिक डिटेनशेन कॅम्प आहे का? या भारतात आम्ही गुलामगिरीचे जीणं कितिकाळ जगायचं? आम्ही स्वतंत्र भारतातले वंचित किती असं कैदी जीवन जगायचं? आमच्या सामाजिक आर्थिक उन्नतीचा येते अजेंडा का नाही? थोडा हात पाय मारलाच सगळी व्यवस्था आम्हाला कैद करायला निघते. गुलाम करायला निघते. बीड जिल्ह्यात सर्वात मोठा गायरान जमिनीचा प्रश्न पुढे आला आहे. कित्येक दलित अत्याचार हे गायरान जमिनिवरूनच झाले आहेत, या ज्वलंत प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही. सगळे सत्तेच्या मस्तीत मग्न आहेत. बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यात समाजावर अन्याय सुरू आहे.  गायरान जमीन हा आमचा जुना प्रश्न नव्याने लढण्याची वेळ आलेली ...

जत आगार कामगार सेना अध्यक्षपदी बळीराम यादव, सचिवपदी पोपट शिंदे यांची बिनविरोध निवड

इमेज
जत/प्रतिनिधी: जत आगार कामगार सेनेची अध्यक्ष /सचिव यांची निवड मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या निवडी करण्यासाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश हंकारे व एस.टी.कामगार सेनेचे जिल्हा सचिव प्रवेश हंकारे,जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, एस.टी.कामगार सेना जत अध्यक्ष पी.टी.मदने ,सचिव पोपट शिंदे , उपाध्यक्ष बळीराम यादव ,दिलीप कोरे,रमेश मिसाळ,मच्छिंद्र बंडगर ,सी वाय पाटील ,विक्रम सुतार व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते . या निवडी प्रकाश हंकारे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव प्रवेश हंकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.अध्यक्ष म्हणून बळीराम यादव व सचिव म्हणून पोपट शिंदे यांची निवड जत आगार एस.टी.कामगार सेना कार्यकारिणीमध्ये करण्यात आली.सर्व कामगार सभासदांनी या निवडीचे स्वागत केले व एस.टी.कामगार सेनेचा जयघोष केला.

पालकमंत्री जयंत पाटील जत साखर कारखाना मोठ्या मनाने सभासदांचा करतील-अजित पाटील

इमेज
जत/प्रतिनिधी:-      जत तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा व तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा साखर कारखाना असावा म्ह्णून राजे विजयसिंह डफळे यांनी जत मध्ये साखर करण्याची निर्मिती केली. तोच साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात देऊन पालकमंत्री जयंत पाटील सभासदांना नक्कीच न्याय देतील असा विश्वास रासपचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी व्यक्त केला.      राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शरद पवार कार्यरत असताना राजे विजयसिंह डफळे यांच्या प्रेयत्नातून जतच्या साखर कारखाना उभारणीला परवाना मिळाला आणि शरद पवार यांच्या हस्ते जत साखर कारखाण्याचे भूमिपूजन संपन्न झाले. राज्यामध्ये सर्वात कमी खर्चात तयार झालेला अडीच हजार म्याट्रिक टन गाळपाचा साखर कारखाना असा इतिहास लाभलेला जतचा साखर कारखाना पुन्हा एकदा सभासदांचा व्हावा ही तालुक्यातील जनतेची माफक अपेक्षा आहे. तसेच राज्यामध्ये योगायोगाने महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे राज्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजेच शरद पवार यांच्याकडे सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँ...

आवंढी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट

इमेज
जत/प्रतिनिधी: आवंढी येथील रखडलेल्या म्हैशाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांची आवंढी गावचे सरपंच तथा सरपंच परिषेदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांच्यासोबत आवंढी येथील शेतकऱ्यांच्या शिस्टमंडळाने भेट घेतली सरपंच कोडग म्हणाले की,अंतराळ येथून म्हैशाळ च्या मुख्य कालव्यापासून येणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनचे काम फेब्रुवारी 2019 ला सुरू झाले. परंतु सदर कामाचा वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा अद्यापही काम पूर्ण झाले नाही.सदर पाईपलाईन चे काम तात्काळ पूर्ण करण्याचे व आवंढी येथील उर्वरित राहिलेला शेतीचा भाग सिंचनाखाली आणण्यासाठी माणिकनगर ते सोळगेवाडी 2 किमी व दत्तनगर ते शिवारवस्ती 2 किमी अशी वाढीव पाईपलाईन करण्याची व येणाऱ्या आवर्तनात पाणी सोडून दुष्काळी गावातील जनतेला दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.येणाऱ्या आवर्तनात या म्हैशाळ योजनेचे पाणी सुरू केल्यास जत तालुक्यातील अंतराळ,शिंदेवाडी, मोकाशेवाडी,बागलवाडी, शिंगणहळी,आवंढी व लोहगाव या गावातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे . सदरचे निवेद...

सलाम मुंबई फौंडेशन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग , सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या तंबाखू मुक्त शाळा अभियाना 2020-21 ......येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी च्या स्कूल ऑफ प्रोग्रेसिव एज्युकेशन (स्कोप) जालिहाळ बु., ता. जत, जिल्हा. सांगली या विद्यालयाच्या सुदीप मुचंडी, वीणा कुंडले, विठाबाई बिराजदार, पुंडलिक कुंडले, प्रमोद तांबे या विद्यार्थ्यांची व तज्ञ शिक्षक म्हणून सुजाता कांबळे मॅडम यांची निवड

इमेज
प्रतिनिधी जत/२४/१२/२० सलाम मुंबई फौंडेशन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग , सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या तंबाखू मुक्त शाळा अभियानामध्ये 2020-21 च्या बाल परिषदेसाठी येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी च्या स्कूल ऑफ प्रोग्रेसिव एज्युकेशन (स्कोप)  जालिहाळ  बु., ता. जत, जिल्हा. सांगली  या विद्यालयाच्या  सुदीप मुचंडी, वीणा कुंडले, विठाबाई बिराजदार, पुंडलिक कुंडले, प्रमोद तांबे या विद्यार्थ्यांची व तज्ञ शिक्षक म्हणून सुजाता कांबळे मॅडम यांची निवड झाली आहे. यासाठी सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे येरळा  संस्थेचे संस्थापक श्री. नारायण देशपांडे यांनी अभिनंदन केले.  तंबाखू मुक्त शाळा अभियान जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी जालिहाळ गावामध्ये व्यसनमुक्ती वर आधारित पथनाट्य सादर करुन व्यसनमुक्ती व धुम्रपानाचे, तंबाखू चे तोटे नाट्यमय रूपानें त्याचे सादरीकरण करून व्यसनाचे धोके समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाद्वारे तरुणांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी, गावाचा विकास, आदर्श देश, आणि कुटुंबाप्रती जबाबदारी यासाठी व्यसन मुक्ती अशा गोष्...

शरद पवारांच्या भुमिकेचे सत्य अण्णा डांगे यांनी सांगावेधनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांचे आवाहन

इमेज
जत/प्रतिनिधी :  ज्येष्ठ नेते अण्णा डांगे हे गेल्या काही दिवसांपासून धनगर एसटी आरक्षणप्रश्नी संभ्रम करणारी माहिती देत आहेत. 2014 साली  शरद पवार यांनी एसटी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण समाजातील नेत्यांनी टीका केल्याने त्यांनी आरक्षण दिले नाही, असे  अण्णा डांगे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील सत्य डांगे यांनी सांगावे, तसेच पुरावे द्यावेत, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे  संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.  अण्णा डांगे हे संस्थापक असलेल्या धनगर महासंघाची नुकतीच धुळे येथे राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत अण्णा डांगे यांचे पुत्र ऑड चिमण डांगे यांची धनगर महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ऑड चिमण डांगे यांचा सत्कार दि. 26  डिसेंबर 2020 रोजी इस्लामपूर (ता. वाळवा) येथे होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणाऱ्या  या कार्यक्रमाला धनगर समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीमंडळात संधी मिळालेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ही उपस्थित राहणार आहेत. या  कार्यक्रमातून ध...

रस्त्याकडेची काटेरी झाडे झुडपे जतकरांसाठी बनलेत मृत्यूचे सापळे... काटेरी झाडे, झुडपे काढण्याचीश्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेची मागणी

इमेज
जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील अनेक गावांत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढले आहेत. या काटेरी झाडा, झुडपामुळे रस्ता तर अरुंद झालाच आहे त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ही बाब गंभीर असताना ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याकडेची झाडे झुडपे वाढली आहेत ती काढण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी चिकलगी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेनी केली आहे. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य प्रशांत कांबळे यांनी यांनी यांबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांना दिले आहे.  श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात तुकाराम बाबा महाराज, प्रशांत कांबळे यांनी नमूद केले आहे की, विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात १२० गावे, वाड्या, वस्त्या आहेत. तालुक्यात बहुतांश सर्व गावांना जायला रस्ते आहेत. गावातून जाणारे रस्ते, वळणावरील रस्ते हे सध्या जतकरांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे...

पश्चिम महाराष्ट्रातुन १ खासदार व १० आमदार निवडून आणू -ज्ञानेश्वर(माऊली) सलगर, - अजितकुमार पाटील

इमेज
जत/प्रतिनिधी:. शिर्डी, अहमदनगर  येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन १९ व २० डिसेंबर २०२० रोजी संपन्न झाले आहे. या अधिवेशनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातुन १ खासदार व १० आमदार निवडून आणू असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ज्ञानेश्वर(माऊली) सलगर व सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केले.   राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनामध्ये देशातील १७ राज्यातून राज्य प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, तेलेंगाना, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यासहित राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल.अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय महासचिव प्रसन्ना कुमार, राष्ट्रीय संघटक महाराष्ट्र प्रभारी पंडित बापू घोळवे , राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय संघटक गोविंदराम सुरनर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, महाराष्ट्र राज्य मुख्यमहासचिव बाळासाहेब दोड...

संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी स्मुर्ती दिनानिमित्त अभिवादन करताना बहुजन समाज पार्टी चे शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे

इमेज
जत/प्रतिनिधी:  येथील हराले समाज बांधवांच्या वतीने जत येथील शिवाजी पेठेतील विठ्ठल मंदिरातील समाज मंदिरात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याचबरोबर गणपती मंदिराजवळ ही पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वगुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी जत शहरात साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करताना रावसाहेब यादव, श्रीकांत सोनवणे, विठ्ठल ऐनापुरे, सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार, विठ्ठल पाटील, शशिकांत शिनगारे, संतोष बाबर, नितीन बाबर, स्वप्नील ऐदाळे उपस्थित होते. .......................... शशिकांत हेगडे (जत) मो.9011019031

जत तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी स्वप्नील (भैय्या) शिंदे

इमेज
जत/प्रतिनिधी: जत नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नगरसेवक व गटनेते स्वप्नील सुरेश शिंदे यांची पाटबंधारे मंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा ना. जयंत पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष निवड करण्यात आली.  पालकमंत्री जयंत पाटील हे काल गुरुवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळयास उपस्थिती दाखविली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी स्वप्नील शिंदे यांची निवड जाहीर करून त्यांना पत्र देउन सत्कार केला. शशिकांत हेगडे (जत) मो.9011019031

व्हसपेट ता.जत येथे महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ. दिनांक ६ डिसेंबर 2020   विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्हसपेठ ता.जत  येथे  बौद्ध बांधवांनी एकत्र येत महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सर्वप्रथम   डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून , सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात  आली व त्यानंतर काहि मान्यवरांनी आपले  विचार मांडले.  या वेळी श्रीकांत हूवाळे सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष तथा नॅशनल दलित मूहमेंट फाॅर जस्टिस सांगली जिल्हा सरचिटणीस , श्री प्रल्हाद हूवाळे सर मागासवर्गीय शिक्षक संघटना विभागीय सचिव पुणे, पत्रकार सचिन झेंडे  पत्रकार,केरापा  हूवाळे  पत्रकार प्रविण कांबळे ग्रा.प सदस्य सूरेश सनदी विनायक मनिमूले पांडुरंग ,केगांर गणेश कांबळे, दौलत हूवाळे  राजु वाघमारे सह  अनेक मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटलांनी 'एसटी- बी' प्रवर्गाची कागदपत्रे सादर करावीतविक्रम ढोणे यांचे आव्हान; सात दिवसांनंतर जतमध्ये होणार निषेध आंदोलन

इमेज
जत/सांगली)/प्रतिनिधी :  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंधरा दिवसांपुर्वी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात बोलताना धनगर समाजासाठी 'एसटी- बी' आरक्षणाची तरतूद केल्याचे विधान केले आहे. मात्र यासंबंधीची माहिती महाराष्ट्रात इतर कोणाला नाही.  त्यामुळे चंद्रकात पाटलांनी यासंबंधीची कागदपत्रे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावीत, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे  संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे. यासंबंधाने आम्ही चंद्रकांत पाटील यांना सात दिवसांची मुदत देत आहोत. या मुदतीत त्यांनी आरक्षणाच्या तरतुदीसंबंधी कागदपत्रे जाहीर  करावीत, अन्यथा जत तहसील कार्यालयासमोर सोमवार, दि. 14 डिसेंबर 2020 रोजी निषेध आंदोलन करण्यात येईल, असे ढोणे यांनी आज  पत्रकार परिषदेत सांगितले.  विक्रम ढोणे म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात धनगर समाजाची घोर फसवणूक झाली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या नेत्यांनी  समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची घोषणा फडणवीस करणार होते, मात्र फडणवीसांनी हा प्रश्न कधीच  सुटणार नाही, अशी व्यव...