पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करजगी येथे मागासवर्गीयांवर अन्याय राशन दुकानचे लायसन्स् रद्द करून संबंधितावर कारवाई करा ...अन्यथा तालुकाभर आंदोलन छेडु. - बसप ,जत

इमेज
प्रतिनिधी जत  करजगी ता. जत येथील सरकार मान्य् स्वस्त् धान्य् दुकान श्री. अशोक रेवणसिध्द् जेऊर हे चालवित असून सदर रेशन दुकानामध्ये गावातील मागासवर्गीय व इतर समाजातील लोक रेशन आणणेसाठी गेलेनंतर सदर दुकानदार धान्याचे वाटप नियमानुसार न करता तसेच अडाणी लोकांचा गैरफायदा घेऊन कमी माल देतात.  धान्य् कमी का दिले याचा जाब विचारल्यास महिला व जेष्ठ् नागरिकांना एकेरी भाषेत व उध्दटपणे बोलतात. तसेच शिवीगाळ व दमदाटी करतात व माझे विरुध्द् कोठेही तक्रार करा असे बोलतात व पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या गावातील रेशन दुकानातून धान्य् घेऊन जाणेस सांगतात.  तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी या व्यक्तीरिक्त् इतर लोकल मार्केट मधील चहापूड, खाद्यतेल, खोबरेल तेल, कपड्याचे साबण, अंगाला लावयचा साबण, कपडे धुण्याचे पावडर व अन्य् वस्तू सक्तीने विकत घ्यायला लावतात व त्याशिवाय स्वस्त् धान्य् दुकानातील माल मिळत नाही.  सदरच्या वस्तू बाजार भावापेक्षा जास्त् दराने लोकांना विक्री करतात. कोविड 19 काळामधील शासनाकडून मिळणारे मोफत धान्य् वाटप नियमानुसार झालेले नसून याची सखोल चौकशी करावी. संबंधित कर...

तब्बल अकरा वर्षांनंतर कोसारी परिसरात पावसाची विक्रमी नोंद.

इमेज
 डाळींब,ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सततच्या अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आला आहे. नदी नाल्यासह मोठमोठे तलावही भरून चालले आहेत.      कोसारी तलाव क्र 02 मधील पाणी तलावनजीकच्या घराच्या उंबरठ्यावर पोहचल आहे. संरक्षण भिंत फक्त कागदावरच.ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याची कमतरता. जनतेचा विषय गंभीर बनला आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस संबंधित चौदा कुटुंबियांना गावठानमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला असुनही ग्रामपंचायत यावर निष्क्रीय असलेची माहीती तेथील नागरिकाकडुन मिळत आहे.

नवनाथ कदम कोसारी (मुंबई पोलीस ) यांनी गुळवंची विद्यालयाला शैक्षणिक साहित्याचे वाटप केले*

इमेज
जत.   कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुद्धा गुळवंची येथील भारतरत्न   डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची शाळेतऑनलाईन  शिक्षण चालु ठेवले आहे . अशा परस्थीतीत समाजाचे आपन काही तरी देने लागतो या उदात्त भावनेणे कोसारी गावचे युवक नवनाथ कदम(मुंबई पोलीस) यांनी  इयत्ता दहावी मध्ये अध्यापन करणाऱ्या  काही गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे  वाटप केले . तसेच गावातील इतर दानशूर व्यक्तींनी सुद्धा शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे वाटप करावे असे आव्हान नवनाथ कदम यांनी केले. मुख्याध्यापक दिनकर खुटाळे यांनी विद्यालयामधील सर्व विध्यार्थ्यानी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.  कार्यक्रमासाठी बसवराज येलगार सर,   जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ सांगली. सामाजिक कार्यकर्ते  दिगंबर गोरे, रावसाहेब खरात, संभाजी खटके,  गुळवची विद्यालयाचे गुरव सर, बाबर सर, सरगर सर, घोडके मॅडम,  राजेंद्र फोन्डे, चंदू पवार  इत्यादी  मान्यवर उपस्तीथ होते.

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा -संभाजी ब्रिगेड

जत/प्रतिनिधी: मराठा समाजाचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार ओबिसीत समावेश करावा या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड च्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धवी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितराव पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना ईमेलद्वारे पाठवले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात राज्य मागास वर्ग आयोग स्थापन केला आहे. यानुसार आयोगाच्या कक्षा या राज्यातील ओबीसी जाती ठरविणे याच आहेत. त्यानुसार नवीन जाती समावेश करणे तसेच जुन्या समाविष्ट जाती बाहेर काढणे बाबतीत राज्य शासनाला सुचवणे एवढीच जबाबदारी आयोगाची आहे.  मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेल्या तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने न्या. एम .जी.गायकवाड मागासवर्ग आयोगाचे गठन केले होते. त्या न्याय. एम .जी .गायकवाड आयोगाने सर्व तपासणी करून आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे निदर्शनास आले आहे. व मराठा समाजात राज्य घटना कलम 340 मधील आरक्षणास पात्र ठरला आहे. न्याय. एम .जी. गायकवाड अहवालातील शिफारशी मान्य करून मराठा समाजाचा सरसकट समावेश राज्यातील अस्तित्वात असल...

राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र ....

इमेज
मुंबई:  कोरोनाच्या काळात राज्य सरकारने खासगी डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. मात्र, राज्य सरकार त्यांच्याबाबतची स्वत:ची जबाबदारी कशी विसरते, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या भेदभावावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे ह्या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली त्याने मात्र माझं मन विषण्ण झाले. खासगी सेवेतील डॉक्टरचा कोरोना काळात सेवा देताना कोव्हीडमुळे मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे आणि कारण पुढे केलं जात आहे की डॉक्टर ‘खासगी’सेवेत होता. मुळात जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जर ह्या विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत ...

जनता कर्फ्यू ऐवजी सर्वत्र कडक लॉकडाऊन करावा तुकाराम बाबा महाराज...मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

इमेज
जत           शहरांपाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून जनता कर्फ्यू ऐवजी सर्वत्र कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी चिकलगी (भुयार) मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.          निवेदनात म्हंटले आहे, सांगली जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात कोरोना सारख्या महाभयानक रोगाचां खूप मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग वाढला आहे. दिवसेंदिवस शेकडो नागरिक या कोरोनाला बळी पडत आहेत. त्यातील काही जण मरण पावत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 19 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. त्यावेळी 23 तारखेला कडक लॉकडाऊन व सर्व सीमा व आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या होत्या. रुग्णांची संख्याही फार कमी व मोजकीच होती. परंतु सध्याच्या घडीला परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे.          रोज २० हजारच्या आसपास रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. रोज एक हजार च्या आसपास रुग्ण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सापडत आहेत. सदरील परिस्थिती खूप भयानक असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वात...

अखेर कोसारीत कोरोनाचा शिरकाव: दोघांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला

इमेज
.अखेर कोसारीत कोरोनाचा शिरकाव: दोघांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला  गावात सर्वञ भितीचे वातावरण.   अखेर कोसारीत  दोघांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला  असुन पॉझिटीव्ह व्यक्तींच्या  संपर्कात अनेकजण असल्याची शक्यता आहे. प्रशासन यंञणा  हवालदिल झाली आहे.     ग्रामपंचायतीने तातडीने पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेल्या परिसरात औषध फवारणी केली,  यावेळी कोसारी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय भाते,सरपंच तानाजी बिसले आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी जनतेला घरीच राहा सुरक्षित राहा कोरोना या महाभयानक रोगापासुन बचाव करा अस आवाहन केले आहे.      

*"आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ हरपला"**आरपीआय (आठवले गटाचे) सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे निधन

इमेज
विटा  -10/2020 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे विटा येथे आज दुःखद निधन झाले. संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बुलंद नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सडेतोडपणे आयुष्यभर झटणारे , सर्वसामान्यांचे आधारस्तंभ अनेकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, प्रशासनामध्ये हातखंडा असलेले निर्विवाद व्यक्तिमत्व, बाबासाहेब कांबळे यांचं आज आकस्मित निधन झाले आणि संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खानापूर तालुकाध्यक्ष म्हणून तब्बल २८ वर्षे काम पाहिले आणि सध्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना बाबासाहेब कांबळे यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनमोल योगदान दिले आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळ घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी बाबासाहेब कांबळे यांचे सर्वश्रेष्ठ योगदान आहे. आक्रमक आंदोलन शैली, प्रभावी वक्तृत्व आणि प्रसंगी न्याय व हक्कासाठी समोरच्याला घाम फोडणा-या ची ताकद असलेले असे हे धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.     बाबासाहेब कांबळे यांनी विटा येथील भारतरत्न डॉ. बाबा...

प्रभाकर सनमडीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

इमेज
जत /10प्रतिनिधी         जनसुराज्य पक्षाचे जत तालुक्यातील नेते प्रभाकर लाह्याप्पा सनमडीकर (वय 59) यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे निधन झाले.   जत येथील जनसुराज्य पक्षाचे नेते तथा शाहुवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांचे स्वीय सहाय्यक  सनमडीकर हे आंबेडकरी चळवळीतील नेते होते. शिखर बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेनंतर ते आ. कोरे यांचे पीए म्हणून कार्यरत झाले होते. 2009 साली त्यांनी जत राखीव मतदारसंघात जनसुराज्य पक्षातून विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या दहा दिवसा पासून ते आजारी होते, सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणजोत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते. कार्यतत्पर , हुशार संघटन कौशल्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जतचे  संस्थापक, व जत तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जत तालुकाध्यक्ष होते. राजकारणी,समाजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाणारे बौद्ध समाजाचे व बहुजन परिवर्तन  चळवळीचे न...

जत येथे शासनामार्फत मका व उडीद खरेदी केंद्र सुरु करा - प्रकाश जमदाडे

इमेज
  जत/प्रतिनिधी: जत हा महाराष्ट्रातील शेवटचा तालुका तसाच हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. हा तालुका महाराष्ट्रतील सर्वात मोठा तालुका असून 53 गावे खरीप तर 67 गावे रब्बी पिकाखाली येतात. तालुक्यातील खरीप क्षेत्र 45000 हेक्टर पेरणी झालेले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील अनेक शेतकरी हक्काचे पीक म्हणून मका आणि उडीद पेरणी करीत आहेत यावर्षी देखील काही भागात पाऊस चांगला झाला आहे. शेतकऱ्यांनी साधारणपणे 5000हेक्टर क्षेत्र उडीद व 7000 हेक्टर क्षेत्र मका पेरणी केली आहे. पाऊस चांगला असल्याने उत्पादन देखील चांगले आले आहे राज्यशासनाने उडीद हमीभाव 6100 रुपये तर मका 1760 रुपये जाहीर केला आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून उडीद 4500 ते 5200 रुपये तर मका 1200 ते 1350 या दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे जत व परिसरातील उत्पादित केलेले पीक हे येथेच शेतकऱ्यांना विकता किंवा खरेदी करता यावे यासाठी राज्यशासनाने खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी जत मार्केट कमिटीचे मा.सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी निवे...

उमदी येथे रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालया तर्फे कीड नियंत्रण प्रात्यक्षिके दाखवताना कृषिदूत व ग्रामस्थ

इमेज
    जत/प्रतिनिधी: नेसरीच्या रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कु.श्रीशैल अभिमन्या लोणी या कृषीदूताने ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमदी ता.जत ,जि. सांगली येथे नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण कसे करावे ,याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले .सुरुवातीला सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक कु. श्रीशैल अभिमन्या लोणी यांनी केले .त्यानंतर कीड नियंत्रण करताना कोणकोणते ट्रॅप्स व ल्युअस वापरतात.तसेच वापरण्याची पद्धती यांचे संपूर्ण प्रात्यक्षिक करुन दाखवले . एकरी प्रमाण व ल्युअर बदलण्याचा कालावधी हे सर्व शेतकऱ्यांना सांगितले . तसेच सदर प्रात्यक्षिक करत असताना शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन कुमार श्रीशैल अभिमन्या लोणी या कृषीदूताने केले. सदर प्रात्यक्षिक covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडले .प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. बी. बिरादार , समन्वय प्रा .एम. डी. माळी , कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. बी. कडपे , विषय प्रमुख प्रा. एल. कोरवर यांचे मार्गदर्शन लाभले.

वळसंग ता.जत येथे भीषण अपघात एकाची प्रकृती चिंताजनक, १०८ अम्बुलंस सेवा ‘नॉट रीस्पोंडीग

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ  वळसंग ता.जत येथे भीषण अपघात  झाल्याची घटना सोमवार दि. ०७.०९.२०२० रोजी दुपारी २ .वाजताच्या सुमारास घडली. मोटार सायकल (MH १० , ८२५६)  व मारुती कार (MH १० CA १७५४ ) यामध्ये घडली या अपघातात  एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे.वळसंग जत रोड वर १ किमी अंतरावर हा अपघात झाला , घटनास्थळा वरील जमावाच्या सांगण्या नुसार हा अपघात मारुती कार आणि दुचाकी ची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवत होते , अपघात ग्रस्त हे सोरडी या गावचे असाल्याचे समजते, घटना स्थळावरून शासनाची रुग्णवाहिका १०८ सेवा देणाऱ्या या नंबर वर फोन केला असता एकही फोन घेतला गेला नाही शेवटी बघ्यांमधून च एक मदतीचा हात आला त्या इसमाने आपल्या स्वतःच्या ओमनी गाडी तून , वळसंग मधीलच तरुणाच्या मदतीने  त्या तीनही जखमींना तातडीने सरकारी रुग्णालय जत येथे दाखल केले , तोपर्यंत या अपघात ग्रास्तांचे नातेवाईक त्याठिकाणी आले , प्रसंगवधान राखत या तरुणानी केलेल्या मदतीने नातेवाईक व घटनास्थळावरील लोकांनी या तरुणांचे आभार व कौतुक केले.  *राखीव रुग्णवाहिकांची गरज*  कोरोन...

सांगली जिल्ह्यासाठी 74 व्हेंटिलेटर प्राप्तरूग्णांना मिळणार दिलासा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

   सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. आता सांगली जिल्ह्याकरिता शासनाकडून तसेच इतर विविध ठिकाणाहून एकूण 74 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील रूग्णांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत याकरिता काही व्हेंटिलेटरचे ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल यांना वाटप केले आहे. यामुळे शहरी भागातील रूग्णांबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांनाही दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.  सांगली जिल्ह्यासाठी शल्य चिकित्सक ठाणे व धुळे यांच्याकडून प्रत्येकी 10 तर वर्धा यांच्याकडून 15 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. महानगरपालिका मुंबई यांच्याकडून 10, पीएम केअर मधून 25, नारायण हॉस्पीटल बेंगलुरू यांच्याकडून 1 असे 71 तर टाटा ट्रस्टकडून उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर साठी 3 असे एकूण 74 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. या व्हेंटिलेटरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 6, विवेकानंद हॉस्पीटल 1, श्री...

*जम्बो कोविड सेंटरने माणसं अक्षरशः तडपडून मारली...**एक थरारक अनुभव

*जम्बो कोविड सेंटरने माणसं अक्षरशः तडपडून मारली...* *एक थरारक अनुभव...* पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन झाल्यामुळे नागिरक मोठ्या अपेक्षेने तेथे जात होते. त्याच अपेक्षेने मी माझ्या नातेवाईकांना भरती करण्यासाठी गेलो. पण, तेथे गेल्यानंतर भयानक वास्तव समोर आले. याबाबतची थोडक्यात माहिती दुसऱया दिवशी फेसबुक आणि ट्विटरवर लिहीली पण... तोपर्यंत वेळ निघून चालली होती. मी, माझ्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिली, अनुभवली. जम्बो कोविड सेंटरने माणसं तडपडून मारली... हेच म्हणेन. पत्रकार पांडुरंग रायकर आणि माझ्या नातेवाईक रजनी खेडेकर यांना खायला न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.... *30 ऑगस्ट 2020:* नातेवाईकांचा फोन आला. अशक्तपणा जाणवतोय. पण, सर्दी, खोकला, थंडी ताप काही नाही. घरात लहान मुले आणि वयस्कर महिला असल्यामुळे त्यांना तपासणी करायला सांगितली. नायडू रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयाने पुढील उपचारासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये नेणार असल्याचे सांगितले. काही वेळातच मी जम्बो सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबलो. रुग्णवाहिकेतून त्यांना आणण्यात आले होते. रुग्णवाहिका रुग्ण...

बहुजन समाजाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील "संस्थात्मक" यंञणेच्या आधाराची गरज

बहुजन समाजाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील "संस्थात्मक"  यंञणेच्या आधाराची गरज..! ✍✍✍✍✍✍✍✍✍ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंञ मजुर पक्ष,शेड्युल कास्ट फेडरेशन सारख्या राजकीय पक्षांची निर्मिती करून शोषित,पिडित समाजाला "न्याय" मिळवुन देण्याचा प्रचंड मोठा यशस्वी प्रयत्न केला.तर पुढे सबंध भारतीयांना सामावुन घेणारा एक राजकिय पक्ष असावा अशा उदात्त हेतुने RPI ची संकल्पना मांडली.तिची ध्येय,उद्दिष्ट्ये,आणि कार्यप्रणाली ही ठरविण्यात आली.तसेच समता सैनिक दल व तिची कार्यप्रणाली बाबासाहेबांनी सांगितली.तर दि.बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ची निर्मिती ही बाबासाहेबांनी केली.या सगळ्या संस्था आणि संघटनांची निर्मिती करत असताना या संस्था व संघटनांची घटना आणि भविष्यकालीन कार्यप्रणाली ही बाबासाहेबांकडुनच लिहुण घोषीत करण्यात केली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मान केलेल्या संस्था व संघटनांची कार्यप्रणाली आणि ध्येय व उद्दिष्ट्ये ही बहुजन व्यापी बहुजन समाजपयोगी आहेत.यात तिळ माञ शंका नाही.जसे,दि.बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे पुढील प्रमाने आहेत.आपण प्रत्ये...

वीज सुरक्षा साधने व कोविड-१९ सुरक्षा साधने न दिल्यास ELA चे थाळी नाद आंदोलन

इमेज
जत/प्रतिनिधी: सांगली मंडळ कार्यालय वीज सुरक्षा साधने व कोरोना सुरक्षा साधनाचे वरील आदेश येऊन देखील लाईनस्टाफ ना वाटप करण्यात आले नाही.  त्यामुळे ELA या संघटनेने १५ दिवसात वीज सुरक्षा साधने व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणारी सुरक्षा साधने खरेदी करून प्रत्येक विभागामार्फत वाटप न केल्यास सांगली मंडळ कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे सुनिल माने यांनी सांगितले.  सध्या वारा वादळाचे व पावसाचे दिवस असताना लाईनस्टाफना विजेची सुरक्षा साधने व कोविड-१९ पादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही साधने न दिल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. MSEDCL ही आशिया खंडातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. सर्व शहरी व ग्रामीण भागात रात्रंदिवस वीज सुरळीत ठेवण्यासाठी लाईनस्टाफ अथक परिश्रम घेत आहेत, कोरोना काळात सर्वाना घरात बसण्यासाठी वीज सुरळीत ठेऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे, पण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सांगली मंडळ कार्यालय जबाबदारी घेत नाहीत.  इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन चे केंद्रीय पदाधिकारी सुनिल माने आणि पदाधिकारी यांनी वारंवार भेटून ...

महावितरण कर्मचाऱ्यांच्या जीवाचे मोल सफाई कामगारांपेक्षा कमी ?

इमेज
जत/प्रतिनिधी:  कोरोनाच्या या महामारी रोगामध्ये सर्वच आपल्या परीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. प्रत्येकाची जबाबदारी पार पाडत असताना डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, बस विभाग या सर्वाना शासनाने 50 लाखाचा विमा जाहीर केला. मात्र फक्त महावितरण मधील कामगारांना 30 लाख रुपये मंजूर केले. म्हणजे महावितरण मध्ये काम करणे स्वस्त आहे का ? असा सवाल सुनील माने यांनी केला आहे. वीज कामगारांच्या कुटुंबाना मिळणाऱ्या 20 लाख रुपये चा तोटा कुणाला विचारायचा. अशी तफावत का हे शासनाने जाहीर करावे. त्याच रोगाने इतर विभागाचे कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबाला 50 लाख आणि महावितरण मध्ये त्याच रोगाने मृत्यू पावल्यास 30 लाख म्हणजे जीवाचे मोल वेगवेगळे कसे ? एवढ्या संघटना, एवढे राजकीय पक्ष असून तेही का गप्प याचे गुपित समजलेच नाही. लॉक डाउन काळात सर्वच विभागाचे कर्मचारी आपल्या जीवाचे रान करून आपले कर्तव्य पार पाडत होते, परंतु work from home आणि सर्व नागरिकांना घरात बसवून ठेवण्यासाठी अखंडित वीज पुरवठा चालू ठेवणारे कधी आठवले नाही. घरामध्ये दिवे, पंखे, फ्रिज, AC, TV, कॉम्पुटर, लॅपटॉप आणि सर्वा...