पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

29 जुलै : धनगर समाज विश्वासघात दिवसबारामतीत धनगर विवेक जागृतीचे लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू

इमेज
जत / PSK NEWS NETWORK बारामती येथील 29 जुलै 2014 ही तारीख धनगर समाज कधीही विसरू शकणार नाही. यादिवशी तत्कालिन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करण्याचा जाहीर शब्द दिला. त्यानंतर तीन महिन्यांत हे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यात धनगर समाजाच्या मतांचा सर्वाधिक वाटा होता. मात्र बोलतील तसे वागतील ते फडणवीस कसले? त्यांनी पाच वर्षे कावा करून धनगर समाजाची घनघोर फसवणूक केली. धनगर समाजाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खच्चीकरण केले. भारत देशाच्या पातळीवर एखाद्या समूहाची एवढी मोठी फसवणूक झाली नसेल. धनगर समाज निद्रिस्त असल्याने आपल्याला काही होणार नाही, या मानसिकतेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टिम आहे. त्यासाठी धनगर समाजातील दलाल आणि गुलाम फडणवीसांनी बरोबर घेतले आहेत, परंतु धनगर समाजातील तरूण भाजपच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे आम्ही धनगर समाज विश्वासघात दिवस, आत्मचिंतन दिवस पाळून प्रबोधन करत आहोत. त्याबरोबर शासन दरबारी निवेदन देत आहोत. आज 29 जुलै 2021 ला त्याच बारामतीच्या मातीत धनगरांच्...

जत तालुक्यातील सर्व चराऊ कुरणे शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यासाठी खुली करा:सुभाष हाक्के

इमेज
प्रतिनिधी जत/ psknewsnetwork    मेंढी माऊली सुखाची सावली हे ब्रीदवाक्य घेऊन मेढंपाळाच्या न्याय हक्कासाठी आणि संरक्षणासाठी  मेंढपाळ  आर्मी या संघटनेची स्थापना 2020साली राष्ट्रीय संसद प्रमुख अर्जुन थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनातून झाली.महेश हावगोडी जत तालुका अध्यक्ष मेंढपाळ आर्मी  यांच्या संकल्पनेतुन सुभाष हाक्के कोसारी (पञकार)यांची जत तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आला.         मेढंपाळाच्या सर्व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचा न्याय हक्कासाठी आणि संरक्षणासाठी सुभाष हाक्के यांनी जत तालुका तहसिल कार्यालय जत येथे मेंढपाळ आर्मी च्या वतीने जत तालुक्यातील सर्व चराऊ कुरणे शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यासाठी खुली करण्यात यावीत या मागणीचे निवेदन देण्यात आलेलं आहे.           सदर निवेदनात असे म्हणाले की सध्या शेळ्या -मेंढ्याना चारण्यासाठी चराऊ क्षेञ ऊपलब्ध नसल्याने मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तालुक्यातील कुरणे शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत. आम्ही मेंढपाळ आपल...

पाण्याची पातळी वाढत आहे, तातडीने स्थलांतरीत व्हा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

*  *स्थालांतरितांना शुध्द पाणी, चांगले भोजन द्या, पशुधनाचे संरक्षण करा, चारा उपलब्ध करुन द्या, निवारा केंद्राच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी प्राधान्याने करा - प्रशासकीय यंत्रणांना निर्देश*  सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : पाण्याची पातळी वाढत आहे. सावधानता बाळगा, तातडीने स्थलांतरीत व्हा, शासन आपल्या पाठीशी असल्याने घाबरुन जाऊ नका, जिल्हा प्रशासनाने निर्माण केलल्या निवारा केंद्रांमध्ये साहित्य, जनावरांसह सुरक्षितपणे पोहचा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.  मौजे डिग्रज, भिलवडी माळवाडी परिसरातील साठेनगर, वसंतनगर, मौलाना नगर, दत्तनगर या पुरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मिरज प्रातांधिकारी समीर शिंगटे, कडेगाव प्रातांधिकारी गणेश मरकड, तहसिलदार निवास धाने, जिल्हा आरोग्य अधिकारी मिंलीद पोरे संबधित ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पावसाचा जोर वाढतच असून नद्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरीभागात पाणी शिरत असून अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लाग...

अतुल दादा कांबळे जतच्या राजकारणात पून्हा सक्रिय

इमेज
जत:PSK NEWS NETWORK अभ्यासू,हुशार आणि शांत संयमी स्वभावामुळे आपल्या कार्याचा ठसा कायम उठवला आहे. गेल्या काही वर्षापासून राजकीय विजनवासात असलेले जत चे माजी सरपंच तथा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी अतुल कांबळे हे पुन्हा जत शहराच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. अतुल कांबळे हे २००६ साली ग्रामपंचायतीवर निवडून आले. त्यानंतर २००७ साली जत चे सरपंच पद त्यांनी भूषविले. सरपंच असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.  अतुल कांबळे हे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून राजकारणात काम करत आहे. पण राजकीय व्यासपीठ पासून चार हात लांबच राहिले होते. २०१७ सालच्या जत नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये बसपाच्या हत्ती या चिन्हावर स्वबळावर एक नगरसेवक निवडून आणला होता. ★★★★★★★★★★★★★★★★★★★★ २०२२ जत नगरपरिषद निवडणूक ; बहुजन समाज पार्टीचे स्वतंत्र पॅनल ...  ★★★★★★★★★★★★★★★★★★★★ २०२२ साली होणाऱ्या जत नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी आत्तापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात दोन बैठका झाल्या असल्या...

बसपा जतच्या वतीने नविन पदाधिकारीऱ्यांची निवड

इमेज
प्रतिनिधी जत/PSK NEWS NETWORK बहुजन समाज पार्टी जत विधानसभा  यांच्या वतीने दिनांक 17/07/2021 रोजी झालेल्या मिटींग मध्ये नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. संख सेक्टर अध्यक्ष मा. हणमंत कांबळे (संख), बिळूर सेक्टर अध्यक्ष मा. अमित कांबळे (बिळूर), उमराणी सेक्टर अध्यक्ष मा. विक्रम कांबळे ( देवनाळ ) , माडग्याळ सेक्टर सचिव मा. गौतम सर्जे (गुड्डापूर), संख सेक्टर सचिव मा. दिलीप कांबळे (अंकलगी ), बिळूर सेक्टर सचिव मा. संजय हणमंत कांबळे ( बिळूर ), उमराणी सेक्टर सचिव मा. गौतम कांबळे ( देवनाळ ) यांची निवड करण्यात आली. यावेळी मा. अतुल (दादा) कांबळे यांनी मार्गदर्शन करताना नव्याने निवड  झालेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येयधोरणे व कार्याबाबत माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली. प्रास्ताविक शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी केले, आभार विधानसभा महासचिव शरद शिवशरण यांनी मानले, यावेळी जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे, प्रभारी महादेव कांबळे, प्रभारी पप्पू तोरणे, कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, विधानसभा प्रभारी परसराम कांबळे,...

कोळगिरी ता.जत येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले

इमेज
PSK NEWS NETWORK प्रतिनिधी जत / १८ जुलै २०२१ बहुजन समाज पार्टी कोळगिरी यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे विधानसभा  कोषाध्यक्ष आयु. प्रशांत बाबर यांच्या  प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित  कोळगिरी शाखेचे पदाधिकारी भिमांना कांबळे विशाल कांबळे प्रवीण बाबर अमोल जाहीर विनोद बाबर राजू साबळे गणेश बाबर सुरेश जाहीर गुड्डू सर्जे श्रीधर कांबळे सुभाष ऐवळे सुनील कांबळे बाबू काळे तसेच अनेक भीमसैनिक उपस्थित होते.

माझी मैना गावावर राहिली...

माझी मैना गावावर राहिली...... माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || ओतीव बांधा | रंग गव्हाळ | कोर चंद्राची | उदात्त गुणांची | मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची | हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती | घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची | रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हि-याची | काठी आंधळ्याची | तशी ती माझी गरीबाची | मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण | नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || अहो या गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची | झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची | वेळ होती त्या भल्या पहाटेची | बांधाबांध झाली भाकर तुकड्याची | घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची | गावदरिला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची | शिकस्त केली मी तिला हसवण्याची | खैरात केली पत्रांची | वचनांची | दागिन्यांन मडवुन काढायची | बोली केली शिंदेशाही तोड्याची | साज कोल्हापुरी | वज्रटिक | गल्यात माळ पुतल्याची | कानात गोखरे | पायात मासोळ्या | दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची | परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीच...

वामनदादा कर्डक ...

वामन तबाजी कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील देशवंडी या छोट्याशा गावी तबाजी आणि सईबाई या दांपत्याच्या पोटी झाला होता. सदाशिव आणि सावित्रा ही त्यांची भावंडे होती. वामनदादांची मराठी साहित्यातील ओळख एक तेजतर्रार असा लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अशी बहुआयामी होती. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळ्या विकणे, टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत. कर्डकांनी लहानपणी आपल्या चरितार्थासाठी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे असे व्याप केले होते. नंतर शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी त्यांनी केली होती., मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी अशी मिळतील अन पडेल ती कामे त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांचा तळागाळातील लोकांशी कायमचा संपर्क राहिला. मात्र अशी कामे करत असतानादेखील त्यांनी आपला वाचनाचा छंद आवडीने जोपासला होता. या शिवाय 'लल्लाट लेख' या नाटकात घुमा या पात्राची...

ज्योतिषशास्त्राने महाराष्ट्र अंधश्रध्देत बुडेलः प्रा. डॉ. विलास खंडाईत

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात या वर्षापासून ज्योतिष शास्त्र  या विषयात पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. इग्नूचा हा निर्णय अत्यंत चूकीचा आहे. हा निर्णय युवा पीढीला अंधश्रध्दावादी बनवणारा असून तो पुरोगामी महाराष्ट्राला अज्ञानात आणि अंधश्रध्देत बुडवणारा आहे, अशी भूमिका अंधश्रध्दा निर्मूलन समितिचे सातारा जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख  प्रा. डॉ. विलास खंडाईत यांनी व्यक्त केली. यासंदर्भात प्रा. डॉ. खंडाईत यांनी अंनिसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर निवेदनही दिले आहे. यावेळी अंनिसचे सचिव अनंता वाघमारे, उपाध्यक्ष सुनील खरात, कोषाध्यक्ष प्रा. प्रविण बोरगावे उपस्थित होते. सदर निवेदनात प्रा. डॉ. विलास खंडाईत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा आहे. त्यामुळे या महाराष्ट्र भूमीला 'बुध्दीच्या देशा' असे म्हटलं जाते. संत चक्रधर स्वामींपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत प्रबोधनाचा वसा या भूमीत रोवला आहे. महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या अणि अशा समाजसुधारकां...

*ओबीसी ईम्पेरीयल डेटा मिळावा चा ठराव माडतांच भाजपा चा गोंधळ ,(१२ आमदार निलंबन)

*जाऊ द्या ना घरी वाजले की बारा...                   ओबीसी^^^ बांधवांनो भाजप चे १२ आमदार निलंबित झाले याकडे लक्ष देण्यापेक्षा^^^ओबीसी^^^ आरक्षण विषय सभागृहात आल्यावर भाजप ने जो राडा  केला तो कश्या करता केला ? याबाबत विचार करणे गरजेचेच आहे ?* भाजपचे 12 आमदार पिठासिन अध्यक्ष लढवय्या शिवसेनच्या श्री.भास्कर जाधव यांनी आज निलंबित केले.ही बातमी महत्वाची असली.तरी या बातमी मागे भाजपचा नीच व कपट्टी चेहरा लपता कामां नये.      महत्वाची बातमी ही आहे की,आज राज्य सरकारने, ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेला इंपीरिकल डाटा केंद्राकडून लवकरात लवकर मिळावा यासाठी सभागृहात आज ठराव मांडला..ओबीसी.. आरक्षणाच्या मुद्द्यावर.. ओबीसी..बांधवांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा ठराव होता. या डाटा शिवाय आरक्षण मिळु शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.      विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारने,सत्तेत असताना ..ओबीसी.. आरक्षणाच्या बाबतीत इंपेरिकल डेटा चे महत्व स्वतःच राज्याला समजावून सांगितले होते ते आठवा.या पार्श्वभूमीवर ...

बहुजन समाज पार्टी जत विधानसभा यांच्या वतीने नविन पदाधिकारी यांची निवड

इमेज
(मातंग भाईचारा कमिटी जत विधानसभा अध्यक्ष गजानन ऐवळे,  डफळापूर सेक्टर अध्यक्ष विकास वाघमारे,  दरीबडची सेक्टर अध्यक्ष अजित कांबळे,  माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे  यांची निवड करण्यात आली.) बहुजन समाज पार्टी जत विधानसभा यांच्या वतीने दिनांक 03/07/2021 रोजी झालेल्या मिटींग मध्ये नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. मातंग भाईचारा कमिटी जत विधानसभा अध्यक्ष गजानन ऐवळे, डफळापूर सेक्टर अध्यक्ष विकास वाघमारे, दरीबडची सेक्टर अध्यक्ष अजित कांबळे, माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी मा. अतुल (दादा) कांबळे यांनी मार्गदर्शन करताना नव्याने निवड  झालेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येयधोरणे व कार्याबाबत माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली. प्रास्ताविक व आभार शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी केले, यावेळी जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, बामसेफ सहसंयोजक महेश शिंदे, प्रभारी महादेव कांबळे, प्रभारी पप्पू तोरणे, जितेंद्र सुर्वे, महासचिव शरद शिवशरण, कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, शहर महासचिव दिपक कांबळे, महेश कांबळे, पृथ्वी वाघमारे इ. उप...