पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घोलेश्वर मध्ये चौरंगी लढत; आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेल जोरदार मुसंडी

इमेज
जत/(प्रतिनिधी): जत तालुक्यातील घोलेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात जागेसाठी बावीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेलच्या प्रमुख नेत्यांनी तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांना संधी दिल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. सत्ताधार्यासह विरोधकांनी ग्रामपंचायत ताब्यात घेण्याकरिता व्यूव्हरचना आखून उमेदवारांची निवड केली आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या घोलेश्वर ग्राम पंचायतीत स्थानिक पातळीवर आघाडी स्थापन करून चार पॅनेल तयार केले आहेत. यावेळच्या निवडणुकीत प्रथमतःच चार पॅनेल असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे.त्यातच आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेलने अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे असे तगडे उमेदवार दिल्याने निवडणूक चुरशीची होणार असून धक्कादायक निकाल अपेक्षित आहे. गावचे अभ्यासू व गतिमान नेतृत्व असणारे माजी सरपंच रमाकांत आटपाडकर आपले ग्रामविकास शेतकरी पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. रियाजमोहशीन नाईक,सपना हेगडे, सुनीता यमगार, गणेश तांबे, सुजाता आटपाडकर, सविता आटपाडकर, यांना उमेदवारी देवून निवडणुकीत रंग भरला आहे. वाड्या वस्त्यांवर काही ठिकाणी वीज नाही. गटारी,रस...

विश्वरत्न Dr.B.R Ambedkar lecture

#बाबासाहेबांचे_शेवटचे_भाषण  20 नोव्हेंबर1956 चे भाषण... डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या पहिल्याच  'भारतातील जाती’ या शोधनिबंधात भारतातील वर्ग हे जातीच्या पोलादी भिंतींमध्ये बंदिस्त आहेत, म्हणजे वर्गच कैदेत बंदिस्त आहे, तर वर्ग लढाई कोण करणार याची जाणीव करून दिली होती. आज तरी त्या वास्तवात काही बदल झाला आहे का? मार्क्‍सला भारतातील जातिव्यवस्थेबद्दल काही देणे होते का?  बाबासाहेब हे भारतातील दलित-अस्पृश्य वर्गाचे नेतृत्व करीत होते. काय होती त्यावेळच्या भारतातील अस्पृश्यांची अवस्था? अस्पृश्य गरीब नव्हते का ? ते भूमिहीन, शेतमजूर नव्हते का ? त्यांचे शोषण-पिळवणूक होत नव्हती का? मग त्यांच्या मुक्तीसाठी आंबेडकरांनी मार्क्‍सवादी क्रांतीचा मार्ग का स्वीकारला नाही? त्याऐवजी ते  लोकशाहीच्या विचारांकडे का वळले? रशियन कम्युनिस्ट राज्यक्रांतीने सारे जग भारावले असताना आणि जगात मार्क्‍सवादाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना डॉ. आंबेडकरांनी मार्क्‍सला बुद्धाचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला.  मार्क्‍स म्हणतो, "जगात पिळवणूक आहे" बुद्ध म्हणतो, "जगात दु:ख आहे." बाबासा...

जतसारख्या दुष्काळी भागात पत्रकारांचे कार्य उलखनीयच- तुकाराम बाबा महाराज★ श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

जत/प्रतिनिधी:- जत तालुका दुष्काळी तालुका. दुष्काळी तालुक्यात आपल्या लेखणीतून शासन,प्रशासनाला जागे करणे, समाजजागृती करणे हे अवघड कार्य. पण अवघड कार्य दुष्काळी जत तालुक्यातील पत्रकारांनी प्रामाणिकपणे केले. आज दुष्काळी जत तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव जिल्ह्यात, राज्यात आपला नावलौकिक करत आहेत. दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा, दुष्काळाचा,विविध सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार बांधवांनी केले. जतसारख्या दुष्काळी भागात पत्रकारांचे कार्य उलखनीयच असल्याचे प्रतिपादन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले. जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रम येथे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून तुकाराम बाबा महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तुकाराम बाबा महाराज यांची आई व वडील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे माजी जिल्ह्याध्यक्ष अजित पाटील, शहराध्यक्ष भूषण काळगी, मानवधिकार संघटनेचे संजय धुमाळ, सांगली जि...

तीन रुग्ण वाहिका तालुक्याला देण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची घोषणा... जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या पहिल्याच मागणीला यश

इमेज
जत/प्रतिनिधी: जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे.उपचारासाठी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याची गरज असते.यासाठी तालुक्याला रुग्णवाहिकेची गरज असून त्या मंजूर करण्याची मागणी जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे जत येथील डॉ. रवींद्र आरळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आरोग्य शिबिरात केली.या कार्यक्रमातच आमदार पडळकर यांनी तीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली.या घोषणेचे स्वागत उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात केले. आमदार गोपीचंद पडळकर हे जतचे प्रसिद्ध डॉ.रवींद्र आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्यावतीने अध्यक्ष अमोल कुलकर्णी, शहराध्यक्ष गोपाल पाथरुट, सचिव शशिकांत हेगडे,शहर सचिव अनिल मदने यांनी तालुक्याला रुग्णवाहिकेची मागणी केली.लागलीच आमदार पडळकर यांनी तीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली. या घोषणेचे उपस्थित नागरिकांनी स्वागत व अभिनंदन केले.विशेष म्हणजे नुकतीच जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेची स्थापना झाली होती.एक सामाजिक बांधिलकी म्हणून रु...

DR. BABASAHEB AMBEDKAR LETTER TO MATA RAMAI

रामू.......🙏🌹🙏 कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले... दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली... मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृ...

जत तालुक्यात होलार समाजातील कुठंबावरील हल्याची दुसरी घटना

इमेज
प्रतिनिधी जत  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांमध्ये होलार  समाजावर अन्यायाची दुसरी घटना धावडवाडी येथे झाली, पहिला  हल्ला  कोसारी  येथील  हेगडे कुटुंबावर होऊन  एक महिना पुर्ण होतो तोपर्यंत दुसरा हल्ला धावडवाडी येथील मुस्लिम समाजातील गावगुंडांनी केला असल्याची माहिती रावसाहेब हेगडे यांनी दिली.धावडवाडी येथील शितोळे कुटुंबातील *महिला* व त्यांच्या *मुलांना* जबरदस्त मारहान गुरुवार दिनांक  31/12/2020 रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली. श्री वसंत रामा केंगार यांची मुलगी सौ -लता विजय शितोळे न दोन मुलांन सह धावडवाडी येथील बस थांब्याशेजारी आपल्या राहत्या घरातून गावातील वडिलांच्या घरी निघाले असता अचानक त्याच्यांच  बाजुने आलेल्या कुत्र्याला हाड म्हणाले असता पाठीमागून येणारी मोटार सायकल आडवी मारुन (1)जनाब - आरिफ गफुर शेख वय  40(2) जनाब- मन्सुर उमर शेख वय (42)व त्यांचे साथीदार या सर्वांनी मिळून महिलेला *धक्का* *बुक्की* केली व त्यांच्या मुलांना *जबरदस्त* मारहाण केली .मुलगा *जीव* वाचवण्यासाठी धावत असता पाठलाग करुन मारहाण केली तसेच परत गावाशेजारुन बस स्टॉप पर्...

माडग्याळ येथे पोलीस व ग्रामस्थ यांच्या सतर्कने मुलगी सापडली.

माडग्याळ/वार्ताहर    कर्नाटक राज्यातील बन्नहटी गावातील एक पंधरा वर्षीय मुलगी घरात वाद झाल्याने कोणालाही न सांगता  गुड्डापुरला आली होती. ती पायी चालत व्हसपेठमार्गे माडग्याळ येथे आली असता पोलीस व  ग्रामस्थांच्या सतर्कतेने मुलगीस शोधून तीला पालकाच्या स्वाधीन  केले.त्यामुळे त्या मुलीच्या पालकांनी माडग्याळ पोलीस औट पोस्टचे पोलिस आणि ग्रामस्थांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.    याबाबत माहिती अशी की कर्नाटक राज्यातील बनहट्टी जिल्हा बागलकोट येथील एक 15 वर्षीय मुलगी दिनांक 1 /1 /2021 रोजी दुपारी एक वाजता त्या मुलीचे आईसोबत  भांडण झाले होते. किरकोळ कारणाने आई रागावल्याने घरात कोणाला न सांगता ती मुलगी बनहट्टी ते गुड्डापुर असे मिळेल त्या वाहनाने प्रवास करत तीर्थक्षेत्र गुड्डापुरला आली होती.  पुन्हा ती मुलगी व्हसपेठ मार्गे पायी चालत माडग्याळ  येथे आली. यावेळी मुलीचे  नातेवाईक यांनी माडग्याळ पोलीस औट पोस्ट येथे येऊन आमची मुलगी हरवल्याची माहिती दिली. पोलीस नाईक राम बन्नेनवर,पोलीस विक्रम घोदे,वसंत बाजीराव  सावंत,गुरुसिद्धा माळी यांनी मु...

अंबाबाई मंदिर परिसरातील वनक्षेत्रात झाडे जाळून खाक

इमेज
  जत/ प्रतिनिधी: जत शहराजवळील श्री.अंबाबाई मंदिर वनिकरणाला आग लागून या आगीत तीन ते चार एकरातील वृक्ष आगीत भस्मसात झाले असून या परिसरात वावरत असलेल्या तळीरामांकडून असे प्रकार वारंवार घडत असल्याने येथिल वनिकरण खात्याविषयी पर्यावरण प्रेमीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरापासून साडेतीन कि.मी.अंतरावर डोंगरनिवासिनी श्री. अंबिका देविचे मंदिर आहे. या मंदिराचे जवळपास तीनशेवर एकरात वनिकरण विभागाने मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षलागवडीमध्ये येथिल विविध सामाजिक संस्था व शाळांचा समावेश आहे.  येथील वृक्षसंवर्धनासाठी वनिकरण विभागाने लाखो रूपये खर्च करून वनिकरणासभोवती तारेचे कंपाउंड ही उभारले आहे.तसेच वनिकरणाच्या देखभालीसाठी वनरक्षकांच्या नेमणुका ही केल्या आहेत.  असे असतानाही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे येथील वनिकरणासभोवती घालण्यात आलेले तारेचे कुंपन ठिक ठिकाणी काही उपद्व्याप करणारेनी काढल्यामुळे या वनिकरणात कोणीही राजरोसपणे आपली जनावरे घेऊन जातो.त्याचप्रमाणे ह...

सरपंच धनाजी पाटील यांचा दणदणीत विजय आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते सरपंच धनाजी पाटील यांचा सत्कार

इमेज
जत/प्रतिनिधी: रेवनाळ ता जत  येथील ग्रामपंचायत विद्यमान सरपंच धनाजी पाटील यांचा अविश्वास ठरावावर विजय मिळवल्या बद्दल काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार.. जत तालुक्यातील रेवनाळ ग्रामपंचायतची निवडणूक 2017 मध्ये झाली त्यावेळी धनाजी पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड आले होते त्यांच्या बरोबर 4 सदस्य त्यांच्या गटाचे निवडून आले गावाचा कारभार चांगला चालला असतांना गावातील भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांनी सदर लोकनियुक्त सरपंचावर सरपंचाच्या गटातील सदस्य फोडून अविश्वास ठराव डिसेंबर 2020 मध्ये पारित केला सदर ठराव जिल्हा अधिकारी यांच्या कडे पाठवण्यात आला त्यावर मा.जिल्हाधिकारी यांनी परत लोकनियुक्त सरपंचाचा पदावर रहाणे अगर नरहाने यांचा फैसला गावातील जनतेने करावा असे आदेश दिले त्या प्रमाणे दि.1 जानेवारी 2021 ला निवडणूक घेण्यात आली लोकांनी मतदान केले त्या मध्ये परत विद्यमान सरपंच धनाजी पाटील 16 मतांनी आघाडी घेऊन निवडून आले या वरून जनता विरोधकांचे मनसुबा हणून पाडला गावातील आजी माजी जि.प.पं.स.सदस्य विद्यमान ग्रामपंचायत 9 सदस्य असे मातबर नेते असताना राष्ट्रीय काँग्रेस च्या कार्यकर्त्यानी मोठी...