पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माडग्याळ करांनी पाहिला वर्दितला देवमाणूस....जत (उमदी) पोलीसांनी केले माडग्याळ मधील गरीब जनतेला जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

इमेज
माडग्याळ  येथे पोलिसांनी येथील गरीब कुटूंबाना कुटुंब उपयोगी जिवनावश्यक  साहित्य वाटप केले. यावेळी जत चे डि .वाय. एस .पी. श्री दिलिप जगदाळे ,उमदि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोळेकर व माडग्याळ ठाणे अंमलदार बसवराज कोष्टि व इतर सहकारी पोलीस व ग्रामपंचायत माडग्याळ चे सरपंच आप्पासाहेब जत्ती इ.उपस्थित राहून प्रत्येक गरीबांच्या घरी जाऊन या वस्तु देण्यात आले. तत्पूर्वी डि .वाय. एस .पी. श्री दिलिप जगदाळे गावातील काही जबाबदार नागरिक व पत्रकार यांच्याशी बोलताना काही मार्गदर्शन पर सुचना केल्या व घरातुन बिनकामाचे बाहेर न पडुन. पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली .     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्याने जिल्ह्यातील शेतमजुरांना हाताला काम नसल्याने रोजंदारीवर काम करनारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,  शासनाने मोफत व सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याची घोषणा करूनही अजून रेशन दुकानात धान्य पुरवठा सुरु झालेला नाही ग्रामीण भागात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करनारे शेतमजूर हाताला काम नसल्याने जिवनावश्यक वस्तू वि...

जत तालुक्यातील ग्रामीण भागात किराणा दुकानदार यांनी आर्थिक लूट थांबवावी मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा

इमेज
संख प्रतिनिधी /31.03.2020 संपूर्ण राज्यभरात कोरोनो व्हायरस ने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण राज्यात लाँक डाऊन व संचार बंदी घालण्यात आली आहे.   परंतू शासनाने आत्या आवश्यक सेवा सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात दवाखाना, मेडिकल, तसेच किराणा दुकाने काही वेळ सुरू ठेवावे. आसे सांगण्यात आले आहे. मात्र जत तालुक्यातील ग्रामीण  भागातील किराणा दुकानदार लाँक डाऊन घोषित केला गेला आहे. म्हणून नागरीकना जीवनावश्यक वस्तूची खरेदी करावी लागते.   या लाँक डाऊन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील ग्रामीण भागातील किराणा दुकानदार जीवनावश्यक मालाची विक्री जास्त किंमत आकारून विक्री करीत असल्याचे  ग्राहका मध्ये बोल्ले जात आहे. जत तालुका हा पूर्वीपासूनच दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आहे. त्यात ह्या कोरोनो व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. तरी ग्रामीण भागातील किराणा दुकानदार याने न, नफा, ना, तोटा, या तत्वावर ग्राहकांना माल दिला पाहिजे .  तसे नाही जमलास जो दर रोज ग्राहकांना दिला जातो तोच दर आता सुदा दिला पाहिजे. आशी माही...

गोंधळेवाडी | श्रीसंत बागडेबाबा मठात पोलिसांना नाष्टा चहा जेवणाची व्यवस्था | तुकाराम महाराज यांचा स्तुत्य उपक्रम

इमेज
                                                                              संख,प्रतीनीधी ( मिलींद टोणे ) 31,मार्च,2020     कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर जत तालुक्यात गावोगावी बंदोबस्त, कर्तव्य बजवणारे जत व उमदी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीसांना गोंधळेवाडी(ता.जत) येथील श्रीसंत बागडेबाबा मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम महाराज यांनी नाष्टा,जेवण कर्तव्याच्या ठिकाणी देण्याचे काम सुरु केले आहे.पोलिसांना मास्कही देण्यात आले.कोरोना विषाणुजन्य हे धुमाकूळ घातला आहे.गावात संचारबंदी,लाँकडाऊन वेळी लोकांना घरात थांबण्यासाठी,गर्दी टाळण्यासाठी,लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम पोलीस कर्मचारी रस्त्यावर भर उन्हात तान्हात कर्तव्य बजावत आहेत. गावातील हाँटेल,चहाची टपरी,खानवळ बंद आहेत. जत, उमदी पोलिस ठाण्यापासून गावे लांब आहेत. त्यामुळे पोलिसांच्या जेवणाचे चहापाण्याचे आबाळ होत होते.उपाशी राहत असल्याचे ...

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन- उपमुख्यमंत्री अजित पवार कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय

इमेज
मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.  ‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली  घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. व...

एप्रिल फुल करणे पडणार महागात , सोशल मिडिया वर कोरोणा बाबतीत एप्रिल फुल निमित्ताने चुकीची माहिती पसरवल्यास खावी लागणार जेलची हवा

इमेज
बारामती (ऑनलाइन):30मार्च2030 कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी ‘एप्रिल फूल’ च्या निमित्ताने कोणत्याही अफवा पसरवू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात एक पत्रक देखील पोलिसांकडून काढण्यात आले आहे.  उद्या एक एप्रिल आहे. त्या निमित्ताने एप्रिल फूल करू नका, भीतीचे वातावरण निर्माण करू नका,  असा  एप्रिल फूल  मेसेज वायरल करणाऱ्या सह ग्रुप अँडमिनला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 140 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार  गुन्हा दाखल होऊन  जेलची हवा खावी लागेल. असं या पत्रकात म्हटले आहे.  दरम्यान, एप्रिल फूल च्या निमित्ताने लोकांकडून वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. मात्र यावर्षी मजा म्हणून किंवा एप्रिल फूल करण्यासाठी कोरोना संबधित चे मेसेज, व्हिडिओ किंवा अफवा यामध्ये जमावबंदी उठवली आहे, यासारख्या आशयाचे मेसेज ही टाकले जाऊ शकतात. या अशा मेसेजमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी एप्रिल फूल करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास, वायरल करणाऱ्...

जिल्ह्यात मोलमजुरांची उपासमार रेशनिंग चे धान्य १ एप्रिल पासून मिळाले पाहिजे- आरपीआय नेते संदेश भंडारे...... शासनाच्या घोषणांची अमलबजावणी तात्काळ करा

इमेज
सांगली / प्रतिनिधी दिनांक ३० - जिल्ह्यातील  मोलमजुरांची उपासमार सुरु झाली असुन तत्काळ  रेशनिंग चे धान्य १ एप्रिल पासून मिळालेच पाहिजे अशी मागणी आरपीआयचे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे यांनी केली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्याने जिल्ह्यातील शेतमजुरांना हाताला काम नसल्याने रोजंदारीवर काम करनारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, शासनाने मोफत व सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याची घोषणा करूनही अजून रेशन दुकानात धान्य पुरवठा सुरु झालेला नाही ग्रामीण भागात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करनारे शेतमजूर हाताला काम नसल्याने जिवनावश्यक वस्तू विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे अनेक घरात चुली पेटत नसल्याचे उघडकीस आले आहे. शहरी भागात काही स्वयंसेवी संस्था मोफत जेवण पुरवत आहेत परंतु ग्रामिण भागात गोर गरिबांना एक वेळच्या जेवणाची सोय होत नाही. तहसीलदार कार्यालयांमध्ये भाजीपाला विक्री व द्राक्षे फळे वाहतूकीसाठी परवाने देण्यासाठी विलंब लावला जात आहे, भाजी पाला विक्रेत्यांना वेठीस धरले जात आहे.  तरी प्रशा...

माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरची गरज... जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिली अचानक भेट...वैद्यकीय अधिकारी व प्रभारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी असे प्रांत अधिकारी जत यांना दिले पत्र

इमेज
  प्रतिनिधी माडग्याळ / माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिली अचानक भेट दिली असता रुग्णालयातील अधिकारी व अधिक्षक यांचा मनमानी कारभार निदर्शनास आला. जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील हे सोम.        दि.30/03/2020 रोजी दुपारी 12 वाजता पत्रकारां समवेत  रूग्णालयात पोहोचले असता , वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य पाटिल व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गडदे हे दोघेही गैरहजर होते, डॉ. पाटील यांना फोन केले असता,वाहन उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले व विठा येथे असल्याने येऊ शकत नसल्याचे सांगितले, डॉ. चैतन्य पाटील हे 24 मार्च 2020 रोजी माडग्याळ रुग्णालयात हजर रिपोर्ट देऊन गेले ते आजपर्यंत आले च नसल्याचे समजले, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम डी गडदे यांची चौकशी केली असता तेही 15 दिवस आले नसल्याचे कळले, डॉ.गडदे यांना फोन केला असता 'माझ्या कडे दोन ठिकाणी चार्ज असल्याने येणे शक्य नाही असे उत्तर मिळाले. त्यांचा हा बेजबाबदार पणा विचारात घेत  जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी संबंधीत वैद्यकीय अधिकारी व प्रभारी अधिक्षक यांची च...

कोरोना पार्श्वभूमीवर कोसारी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी

इमेज
कोसारी /प्रतिनिधी .दिनांक:30/03/2020.      मौजे कोसारी. ता .जत .येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोसारी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी. यामध्ये कोसारी ग्रामपंचायतीचे सरपंच /उपसरपंच /ग्रामसेवक /सदस्य आणि कर्मचारी  व तसेच कोसारी सर्व सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ  यांनी  संपूर्ण कोसारी गावातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मोफत देण्यात आले आहे.       ग्रामपंचायत कोसारी व सर्व  सेवा सोसायटीने कोरोना या रोगाचा प्रसार पाहुन जोपर्यंत कोरोना विषानुचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत संपूर्ण गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देण्यात आले आहे. तसेच पाणी घेऊन जाण्यासाठी योग्य रित्या काळजी घेऊन सुव्यवस्था जपण्यात आली आहे. संपूर्ण गावातून  या आभिनव योजनेचे स्वागत /कौतुक करण्यात येतआहे.      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा आणखी भरपूर काही उपाय योजना आखण्यात आल्या आहेत.गावात जास्त ठिकाणी माणसे बसतात अशा  विविध ठिकाणी  त्यांचे बंदोबस्त करण्यात आले आहेत.

रेशन कार्ड नसणाऱ्या ना हि मिळणार राशन ....महाविकास आघाडी चा निर्णय....कोरोणाच्या धर्तीवर सर्वसामान्यांना दिलासा

इमेज
मुंबई :  कोरोना संकटामुळे  आणि राज्यात लॉक डाऊनची  परिस्थिती असल्याने राज्यातील सर्वसामान्य जनतेला महाविकास आघाडी सरकारने दिलासा दिला असून,गरीब आणि गरजू जनतेसह रेशन कार्ड नसणा-यांनाही रेशन दुकानातून तीन महिन्याचे धान्य मोफत मिळणार आहे.राज्य सरकारने आज संबंघित दुकानाची  आणि मोबाईल नंबरची यादी प्रसिद्ध केली आहे.सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने हातावर पोट असणा-यांची काळजी राज्य सरकार करेल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिली होती त्यानुसार आता अडचणीच्या काळात गरीब आणि गरजू जनतेच्या  अडचणीसाठी धावून गेले आहे.गरीब व गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील रेशन दुकानांची यादी मोबाईल नंबरसह देण्यात आली आहे. शिवाय रेशनकार्ड नसणा-यांनाही सध्याच्या लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येवू नये म्हणून रेशन दुकानात एक फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.तो भरून दिल्यास संबंधित व्यक्...

ग्राम पंचायत व्हसपेट कडुन अन्न धान्य व भाजीपाला वाटप...कोरोणाच्या संकटात सापडलेल्या गरीब जनतेची केली मदत....लोक नियुक्त सरपंच राम साळुंखे व सन्माननीय सदस्यांनी राबवला उपक्रम

 प्रतिनिधी माडग्याळ /30,  (सचिन झेंडे) कोरोणा विषाणूच्या धास्तीने सर्व मार्केट बंद असुन नागरिकांना अन्न धान्याचा तुटवडा भासत आहे अशी परिस्थिती आहे, हे लक्षात घेऊन व्हसपेट गावचे सरपंच राम साळुंखे व सर्व सदस्य मिळुन धान्य व  कांदा ,बटाटा अशा अन्नधान्याचे वाटप  करण्यात आले यावेळी गावचे सरपंच राम साळुंखे , सदस्य अंबाजी वगरे, मजिद भाई नदाफ, सुरेश सनदी ,  पंडितराव हुवाळे महाराज, ग्रा.पं शिपाई तसेच विनायक मनिमुले, प्रविण कांबळे  सचिन झेंडे पत्रकार इत्यादिंनी यावेळी कामात मदत केली.                                            कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जत तालुक्यातील व्हसपेट येथे सरपंच राम (भाऊ) साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात आली असुन, या समितीच्या वतीने कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत,  ग्रामपंचायत व आरोग्य विभागा कडून परगावाहून आलेल्या नागरिकांचे ...