जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील शेगाव येथे चिंचेच्या झाडाचा पहिला , दुसरा नव्हे तर २१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुष्काळी जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसाव्याच्या ठिकाणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या उपस्थित हा वाढदिवस सोहळा रंगला. शेगाव येथील प्रल्हाद बोराडे हे सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. मूळचे शेगाव येथील प्रल्हाद बोराडे व त्यांच्या पत्नी उज्जवला बोराडे यांनी ने २१ वर्षांपूर्वी पहिले चिंचेचे झाड शेगाव येथे लावले. राजाराम शिंदे यांनी नियोजनबध्द झाडांची लागण केली तर त्याचे पालनपोषण संभाजी बोराडे यांनी केले. २१ वर्षात नुसते झाडेच त्यांनी लावली नाहीत तर ती जोपासलीही आहेत. २१ वर्षात लावण्यात आलेल्या या झाडांमुळे हा भाग आता चिंच विसावा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जिकडे पहावे तिकडे चिंचेची झाडे आहेत. प्रत्येक झाडाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. झाडांना नद्यांची नावे देण्यात आली आहेत. चिंच विसाव्याला थांबले की तेथील वेगळेपण ...
जत /14 एप्रिल 2020 जत शहरात सोशल डिस्टंसिग पाळत , विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जत चे तहसीलदार सचिन पाटील ,जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे,आर पी आय (आ.)जि.अध्यक्ष संजय कांबळे, अशोक नाना कांबळे,हणमंत कांबळे गुरुजी,शरण जाविर ,पदम उमराणी,प्रशांत झेंडे, शिराज शेख, आदी उपस्थित होते. यावेळी पो.निरिक्षक रामदास शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व या कठीण परिस्थितीत प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. जगभरात कोरोणा विषाणू ने थैमान घातले असुन , भारतात सुद्धा तितक्याच वेगाने हि साथ पसरत असताना दिसते आहे , कोरोणा विषाणू रोखण्यासाठी संपूर्ण भारतात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन आहे, त्यामुळे देशातील सण उत्सवावर बंधन आल्यचे दिसते आहे, यातच संपूर्ण जगभरात आनंदाने वाजत गाजत होणारा सण म्हणजे 14 एप्रिल, विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , पण यावेळी महाभयानक संकट जगभर पसरल्याने, देशातील सर्व भीमबांधवानी प्रशासनाने केलेल्या आवाहनास ओ देत महामानव ...
शिक्षक दिन भारतातील पहिले आणि कदाचित शेवटचे शिक्षक ज्यांनी ज्ञानाची गंगा अज्ञानांपर्यंत पोहचवताना निशुल्क काम केले, मनुवादी भारतात मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी स्वतः, स्वतःच्या पत्नीला शिक्षित करून स्वखर्चाने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, भारतातील पहिले शिक्षक ज्यांनी शिकविताना जातीभेद केला नाही, भारतातील पहिले महामानव ज्यांनी शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कैफती खुद्द इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्या दरबारा पुढे मांडल्या...... असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे शिक्षक दिनाचे मानकरी.....! राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 देशभरात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.हा उत्सव लोकाभिमुखाने साजरा होत नसला तरी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा अधिकृत पणे शासकीय पातळीवर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. खरे तर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे समाजसुधारणेचे शिक्षक होते. ‘प्राथमिक शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी रचला. मुलींच्यासाठी मोफत शाळा सुरु केल्या. डॉ. राधाकृष्णन यांच्या जन्मापूर्वी चाळीस वर्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा